वृत्तपत्र प्रकाशित
जव्हार, दि. २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती, जव्हार यांच्या वतीने तालुकास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आज सकाळी पंचायत समिती कार्यालय जव्हार येथून अमृत सरोवर पर्यंत पायी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये गटविकास अधिकारी जव्हार, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी ,सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचारी, भारती विद्यापीठ प्रशाला जव्हार व जिल्हा परिषद काळीधोंड शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "वसुंधरेला वाचवा", "स्वच्छ हवा, निसर्ग हवा" कावळा बोलतो काव काव ,एक तरी झाड लाव ,झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देत ही पायी रॅली जनजागृतीसाठी प्रभावी ठरली. अमृत सरोवर येथे वृक्षपूजन करून वसुंधरा गीत व आरती सादर करण्यात आली. नंतर वृक्षारोपण करून परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाच्या शपथा घेतल्या. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्व स्तरांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे होय. तसेच २२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये निसर्गभित्तीचित्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, पाणलोट क्षेत्र संवर्धन, प्लास्टिक मुक्ती अभियान यांचा समावेश आहे. यासर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहेत. या उपक्रमामधून निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारी आणि भान निर्माण व्हावे, असा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.तसेच आज सर्व ग्रामपंचायती मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, रॅली व विविध प्लस्टिक मुक्त अभियान अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनीही या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिनांक :22/04/2025
Download
जव्हार, दि. २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती, जव्हार यांच्या वतीने तालुकास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आज सकाळी पंचायत समिती कार्यालय जव्हार येथून अमृत सरोवर पर्यंत पायी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये गटविकास अधिकारी जव्हार, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी ,सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचारी, भारती विद्यापीठ प्रशाला जव्हार व जिल्हा परिषद काळीधोंड शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "वसुंधरेला वाचवा", "स्वच्छ हवा, निसर्ग हवा" कावळा बोलतो काव काव ,एक तरी झाड लाव ,झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देत ही पायी रॅली जनजागृतीसाठी प्रभावी ठरली. अमृत सरोवर येथे वृक्षपूजन करून वसुंधरा गीत व आरती सादर करण्यात आली. नंतर वृक्षारोपण करून परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाच्या शपथा घेतल्या. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्व स्तरांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे होय. तसेच २२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये निसर्गभित्तीचित्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, पाणलोट क्षेत्र संवर्धन, प्लास्टिक मुक्ती अभियान यांचा समावेश आहे. यासर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहेत. या उपक्रमामधून निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारी आणि भान निर्माण व्हावे, असा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.तसेच आज सर्व ग्रामपंचायती मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, रॅली व विविध प्लस्टिक मुक्त अभियान अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनीही या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.test
दिनांक :23/05/2017
Download
test